राजकीयसामाजिक

समाजकारणाचा नवा वसा- श्री भगतसिंग चौगुले बांबवडे

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी हे तालुक्यातील नामांकित गाव आहे. इथं राजकारण ,व्यापार आणि शेती सौहार्दाने होते. हे गाव तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ आहे. अशा गावचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यासाठी मी यशस्वी प्रयत्न करणार आहे., असे मत येथील भगतसिंग तानाजीराव चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.


दरम्यान गावाच्या विकासासाठी एक नवा चेहरा,गावाच्या राजकीय पटलावर येत आहे. श्री भगतसिंग हे या अगोदर राजकीय पटलावर नव्हते. त्यांचे चुलत बंधू, वडील हि मंडळी जरी राजकारणात असली, तरी भगतसिंग नावाचा एक नवा चेहरा बांबवडे गावाच्या समाजकारणात उतरत आहे. जुन्या अनेक चेहऱ्यांनी गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्यापही त्याची संपूर्ण पूर्तता झालेली नाही. यासाठी हा नवा चेहरा बांबवडे गावाच्या राजकीय पटलावर येत आहे. एकदा नव्या चेहऱ्याला संधी द्यायला काय हरकत आहे ? असा सूर ग्रामस्थातून येत आहे.

यावेळी श्री भगतसिंग पुढे म्हणाले कि, या अगोदर कुणी काय केले, या फंदात मी पडणार नसून, भविष्यात मला या गावासाठी काय करता येईल, ते मी सगळ्यांना सोबत घेवून करणार आहे. या अगोदर अनेकांनी आश्वासने दिली असतील, आणि त्यांनी ती जरी पूर्ण केली नसतील, तरी गावाच्या विकासासाठी मी आणि माझे सहकारी मिळून पूर्ण करू. तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता मुबलक असूनही, अद्याप त्याचे नियोजन साधले जात नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देवून प्रत्येकाच्या नळ कनेक्शन ला वेळेत मुबलक पाणी पुरविण्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत.


एकंदरीत गावात कितीही राजकारण असले, तरी आपण बांबवडे वासीय समाजकारणात कसे अग्रेसर राहू, याकडे आमचे लक्ष असणार आहे. गावातील बेरोजगार तरुण यांना रोजगार मिळून देण्यासाठी उच्च स्तरीय प्रयत्न करणार आहे. गावात जसे पिण्याला मुबलक पाणी आहे. परंतु गावात बाजारहाट करण्यासाठी आलेल्या लोकांना शौचालयास जाण्यासाठी मोठी अडचण भासते. यासाठी सुद्धा आपले प्रयत्न असणार आहेत.


असो, या गोष्टी होत राहतील, पण माझा बांबवडे वासीय ग्रामस्थ भविष्यात नाराज होणार नाही, असे समाजकारण आम्ही करणर आहोत. यासाठी आपल्या सर्व बांबवडे ग्रामस्थांचे, व्यापारी वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. गावाच्या विकासाच्या अनेक योजना आम्ही तयार केल्या आहेत. आणि त्या पूर्ण देखील करणार आहोत. यासाठी आपल्या माय भगिनींची मोलाची साथ मिळावी, आपले आशीर्वाद मिळावेत, हि आपली प्रामाणिक इच्छा आहे.


भविष्यात ग्रामस्थ नाराज होणार नाहीत, असा गावाच्या विकासाचा चढता आलेख आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उभा करू. असेहि मत श्री भगतसिंग चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!