सामाजिक

सर्व लोकप्रतिनिधींनी कंबर कसावी : जनतेतून मागणी

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य नियुक्त झाले आहेत. परंतु या लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या विकासासाठी श्रीगणेशा करावा, अशी जनतेची मागणी आहे.

गेले वर्षभर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती चे सदस्य पद रिक्त होते. त्यामुळे जनतेला शासनाच्या योजनांची कोणतीही माहिती जनतेपर्यंत पोहचत नव्हती. त्यामुळे शासकीय योजना त्यांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नव्हत्या. परंतु आता या नियुक्त्या झाल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकीला जावून तेथील प्रशासकीय योजना समजून घ्याव्यात. त्यांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी. ज्यामुळे सर्व सामान्य लाभार्थ्यांना त्या योजनांचा फायदा मिळेल. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. शेतकरी आपल्या शेतीची मशागत करण्यात मग्न आहे. लवकरच शेतकऱ्यांना बियाणांची  गरज भासणार आहे. तसेच खतांची गरज भासणार आहे. याची काळजी लोकप्रतिनिधींनी घ्यावी. शाहुवाडी पंचायत समितीच्या सदस्यांनी देखील लवकरच मासिक सभा घ्यावी.

त्यामाध्यमातून जनतेला आवश्यक असलेल्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत आपण अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात.

एकंदरीत काय लोकप्रतिनिधींनी कंबर कसावी, आणि जनतेला प्रशासकीय  योजनांचा लाभ मिळवून द्यावा. सर्व लोकप्रतिनिधींचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या  वतीने हार्दिक अभिनंदन .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!