सामाजिक

स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांची शिराळा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

बांबवडे : शिराळा तालुक्यातील बत्तीस शिराळा न्यायालयाच्या वतीने शाहुवाडी आणि शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सन २०२३-२४ साली ऊस दरवाढ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने याबाबत शिराळा न्यायालयात हा फुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत न्यायालयाने निकाल देताना या कार्यकर्त्यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे.उसाला प्रती तन ५०/- रुपये अधिक मिळावे , तसेच २०२४ साली तुटल्या जाणाऱ्या उसाला पहिली उचल ३,५००/- रुपये मिळावी, यासाठी स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ७५/-रुपये प्रमाणे ४५० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले.या केस मध्ये वकील ए.एम. मुलाणी यांनी काम पाहिले.
या केस मध्ये शाहुवाडी आणि शिराळा तालुक्यातील स्वभिमानी चे कार्यकर्ते सुरेश म्हाउटकर, बांबवडे, भैय्या थोरात वडगाव, गुरुनाथ शिंदे डोणोली, राजू पाटील रेठरेकर, मानसिंग पाटील, शिवलिंग शेटे, दादासो पाटील सागाव, प्रकाश पाटील कांदे, देवेंद्र धस बिळाशी, रवी पाटील पाडळी, प्रदीप पाटील कणदूर, राम पाटील शिराळा या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अशी माहिती राजेंद्र पाटील रेठरेकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!