१४ मार्च रोजी बांबवडे इथं चुकीच्या वीज बिलांची दुरुस्ती : स्वाभिमानीचे आवाहन
बांबवडे : सोमवार दि.१४ मार्च रोजी शेतकऱ्यांची चुकीची वीज बिले दुरुस्त करून मिळणार आहेत, तेंव्हा सर्व शेतकरी बंधूंनी या सुविधेचा लाभ घेवून, आपली चुकीची बिले दुरुस्त करून घ्यावीत, अशा आशयाचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले..


नुकत्याच झालेल्या वीज बिल आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून चुकीची वीज बिले दुरुस्त करून शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच शेतकऱ्याला दिवसा दहा तसं वीज मिळण्यासाठी आग्रह धरला होता.


त्या चर्चेतून प्राथमिक दृष्ट्या चुकीच्या वीज बिलाची दुरुस्ती करणेस शासनाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने सोमवार दि.१४ मार्च रोजी शेतकऱ्यांनी बांबवडे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावून वीज बिले दुरुस्त करून घ्यावीत. ज्या माध्यमातून वीज बिलाची रक्कम कमी होईल. यासाठी सुरेश म्हाऊटकर यांनी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.