विविध मागण्यांसाठी शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण
शाहुवाडी : जनसुराज्य शक्ती पक्ष शाहुवाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना शाहुवाडी, कानसा वारणा फौंडेशन महाराष्ट्र राज्य,शाहुवाडी, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कोल्हापूर यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी दि.१४/१२/२०२० पासून साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन शाहुवाडी तहसील कार्यालयास देण्यात आले होते..
या विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. यापैकी १. थकीत वीज बिल माफी, २. शेती पंप वीज कनेक्शन जोडणी, ३. छोट्या व्यावसायिकांचे वीज बिल माफ करणे, ४. ग्रामपंचायत थकीत वीज बिलावरील व्याज माफी करणे, ५. ग्रामपंचायत हद्दीतील नवीन वसाहत मधील नवीन कनेक्शन व लाईन टाकणे, ६. ठेकेदारांकडून प्रलंबित कामे पूर्ण करणे, ७. धरणग्रस्तांना तालुक्यातील वस्त्यांना तत्काळ वीज कनेक्शन देणे, ८. बांबवडे शहरात वीज व्होल्टेज नियमित करणे, ९. शेतकऱ्यांसाठी शेती वीज पुरवठा दिवसा करणे, आदी मागण्यांसाठी हे साखळी उपोषण करण्यात आले आहे.
या निवेदनावर कानसा वारणा फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णा पाटील विरळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष राजेंद्र पाटील रेठरे, हरिबा पांडुरंग घोलप धरणग्रस्त, सुरेश नामदेव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विरळे, लक्ष्मण पाटील, भैय्या थोरात, सुरेश म्हाऊटकर बांबवडे, जयसिंग पाटील चरणकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.