महामार्गावरील खड्डे न भरल्यास ‘ रास्ता रोको ‘ : शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी
बांबवडे प्रतिनिधी : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शिवसेनेच्या वतीने खड्डा पूजन आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, येत्या पंधरा दिवसात खड्डे संबंधित खात्याकडून न भरले गेल्यास ‘ रास्ता रोको ‘ आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी दिला आहे.
या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांच्या अपघातात वाढ झाली असून ,चार चाकी वाहनांचा खुळखुळा होवू लागला आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत असून, त्याचबरोबर हे खड्डे अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. म्हणूनच या खड्ड्यांवर लवकरात लवकर मार्ग न काढल्यास शिवसेना उग्र आंदोलन करणार असल्याचेही श्री. गिरी यांनी सांगितले.
यावेळी बांबवडे शहरप्रमुख सचिन मूडशिंगकर, गोगवे सरपंच विकास पाटील,विजय लाटकर, बिरू कांबळे, राहुल दवंग, राजू शित्तुरकर ,अलका भालेकर मॅडम आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.