भारताचे “ऑपरेशन सिंदूर “: पहलगाम हल्ल्याचा बदला :जय हिंद
बांबवडे : पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा काल मध्यरात्री पाकिस्तान मधील ९ दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने हल्ले करून बदला घेण्यात आला. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. “ऑपरेशन सिंदूर “च्या माध्यमातून भारतीय लष्कराने हा पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे.
लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आदी दहशतवादी संघटनेच्या ९ तळांवर हल्ला करण्यात आला आहे. पहलगाम मधील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना हि भारतीय लष्कराने वाहिलेली श्रद्धांजली.असेल. म्हणूनच या ऑपरेशन ला “ऑपरेशन सिंदूर “असे नाव देण्यात आले आहे. सैन्याच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन. जय हिंद.