राजे, तुम्हीच आमचं वैकुंठ ,आणि तुम्हीच आमची पंढरी
… राजे आपल्या हयातीत आपण केलेलं बलिदान, आजही या मातीचे अलंकार आहेत. आपण दिलेलं सर्वस्वाचं बलिदान हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. आपल्या या जयंतीनिमित्त सा.शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज परिवार आपल्याला सविनय मानाचा मुजरा करीत आहे.
आपण केलेलं सर्वस्वाचं अर्पण, हा महाराष्ट्र आपल्या ताठ मानेवर मानाने मिरवीत आहे. महाराष्ट्राची सद्यस्थिती तितकीशी बरी नाही. आपण घालून दिलेल्या मार्गावर चाललेलं एक वादळ शमलं आहे. पुन्हा तसं व्यक्तिमत्व होणे नाही. ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हे होत. ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी तुम्ही हलकल्लोळ केलात, त्याचप्रमाणे मराठी माणूस जगावा, टिकावा, आणि मोठा व्हावा, यासाठी अवघा महाराष्ट्रच नव्हे, तर दिल्ली च्या तख्तापर्यंत धडक मारली होती. परंतु त्यानंतर मात्र आज खऱ्या अर्थाने विचार केला, तर तसं नेतृत्व पाहायला मिळत नाही. ज्यांनी हिंदू धर्म वाढावा , यासाठी गर्व से काहो हम हिंदू है !!! हि घोषणा केली होती. ती हवेत विरली कि, काय ? असा प्रश्न पडतो. राजे, आपल्या नावाने उभारलेली शिवसेना आज आपला राजा शोधतेय. केवळ आडनाव असणे , एवढे पुरे होत नाही,तर त्यासाठी तेवढे समर्पण सुद्धा गरजेचे असते, दररोज सकाळी एक भोंगा वाजवला कि होत नाही. हे सध्याच्या नेत्यांना समजत नसेल काय ? दुसरीकडे शिवसेना मिळविण्यासाठी आपल्याच घराशी केलेली फितुरी किती योग्य आहे? याचासुद्धा विचार व्हायला हवा. हे कोणत्या पक्षासाठी नाही,तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आहे. असंगाशी संग केला. आणि होत्याचे नव्हते झाले. परंतु दुसरीकडे सुद्धा काय आहे. याचे सुद्धा चिंतन झाले पाहिजे. केवळ सत्तेसाठी ज्यांनी इतरांची घरे फोडली,त्यांचे तरी काय कर्तुत्व मानावे. ज्यांना महाराष्ट्राचा निर्णय घेण्यासाठी दिल्ली चे उंबरे झिजवावे लागतात,त्यांनी कशाला महाराष्ट्राचे कैवारपण स्वीकारावे. करण आमचे राजे दिल्ली समोर कधी झुकले नाहीत, महाराष्ट्र सुद्धा कधी झुकणार नाही. कारण राजांनी आम्हाला स्वराज्याचे धडे दिले आहेत. त्या माना सत्तेसाठी दिल्ली समोर का झुकवाव्यात.. ज्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्र चालवायचा असेल, तर इथले निर्णय इथेच व्हावेत, अन्यथा केवळ सत्तेसाठी लांगुलचालन काय कामाचे. म्हणूनच नव स्वराज्य निर्मितीसाठी इथला तरुण पुढे आला पाहिजे. केवळ दिल्लीकरांसाठी झुकणे, हे या राज्याला परावलम्बित्वाकडे नेणार यात शंका नाही.
राजे यासाठीच का केला होता अट्टाहास. पुनश्च स्वराज्य निर्माण व्हावे, आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीमहाराज अवतारावेत अशीच अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. राजे पुनश्च आपणास मनाचा त्रिवार मुजरा …