Uncategorized

शेतकऱ्यांना प्रोत्साहन पार अनुदान त्वरित मिळावे- श्री कृष्णा पाटी

बांबवडे : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर ५००००/- रुपये अनुदान २०१९ मधील मागील शासनाने जाहीर केल्याप्रमाणे त्वरित त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत. अशा आशयाचे निवेदन कानसा विकास सेवा संस्था विरळे-जांबूर तालुका शाहुवाडी चे संचालक कृष्णा गणपती पाटील यांनी प्रांताधिकारी श्री निखील खेमनार यांना दिले आहे. तसेच त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण आज दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसीलदार कार्यालयाच्या दारात केले आहे.


या लाक्षणिक उपोषणास साभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.


या निवेदानात पुढे नमूद केले आहे कि, पी.एम. किसान योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांना आयकर फाईल केल्याचे कारण दाखवून टाळले जात आहे. दरम्यान शेतकरी जरी आयकर फाईल करीत असले तरी त्यांचे उत्पन्न कमी आहे. या गोष्टी कडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर जाचक अटी लादून त्यांना पी.एम.किसान योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. तरी या जाचक अटी शिथिल करून शेतकऱ्याना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी श्री बायजी गणपती पाटील, अनिल विष्णू पाटील, संदीप आकारम गायकवाड, गणपती रामचंद्र तावरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री सुरेश म्हाऊटकर, श्री वसंत पाटील, श्री अमोल महाजन, श्री गणेश महाजन, श्री राजू केसरे उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!