कर्मचाऱ्यांच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेवू -श्री रवींद्र देशमुख
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील अथणी शुगर्स च्या जमीनधारक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केला होता. यानंतर अथणी शुगर्स व उदय शुगर्स च्या दोन्ही व्यवस्थापनाने जमीनधारक कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दोन्ही व्यवस्थापनाने लेखी दिले आहे. त्यानंतर जमीनधारक कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले.
अथणी शुगर्स कडे काम करीत असलेले जमीनधारक यांच्या अनेक प्रलंबित मागण्या होत्या. त्या अनुषंगाने त्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हा रास्ता रोको करण्यात आला होता. त्यासंदार्भाचे निवेदन अथणी प्रशासनाला देण्यात आले आहे. त्याबाबत दोन्ही प्रशासन सकरात्मक चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या समाधानाचा मार्ग काढण्यात येईल .असे लेखी आश्वासन कार्यकारी संचालक श्री रवींद्र देशमुख यांनी बांबवडे सोनवडे च्या जमीनधारक कर्मचाऱ्यांना दिले आहे. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी रास्ता खुला करण्यात आला. या चर्चेवेळी अथणी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी संचालक रवींद्र देशमुख, प्रल्हाद पाटील, उदय साखर चे भगवान पाटील तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, श्री.सिंघण वकीलसाहेब,जमीनधारक कर्मचाऱ्यांच्यावतीने दीपक निकम, राजेंद्र निकम, दिलीप बंडगर , संदीप भगवान निकम , संजय निकम, सोनवडे चे अंकुश पाटील यांच्यासहित दोन्ही गावाचे जमीनधारक कर्मचारी उपस्थित होते.