ज्ञा नेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त “ ज्ञान माउली ” कार्यक्रम संपन्न
बांबवडे : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त बांबवडे इथं “ ज्ञान माउली ” कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सातबारा या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, अंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यावतीने तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रम अंतर्गत “ ज्ञान माउली ” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराजांनी अलौकिक साहित्य निर्मिती मध्ये अध्यात्मिक विचार आणि समाज प्रबोधन यांच्या माध्यमातून समाजावर अलौकिक ठसा उमटवला आहे. त्यांच्या समानता, आणि मानवता यांचा प्रभाव भक्तीच्या माध्यमातून जनमानसावर कोरला गेला आहे.
यावेळी शाहीर शामराव खडके यांच्या कलाकार सहकाऱ्यांनी आणि तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मंडळींनी भजन कीर्तन, अभंग, दिंडी असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच ज्ञानेश्वर माउलींची विशेष भूमीका साकारलेले गोवर्धन सिंघन, व लहानगी मुक्ताई ची भमिका राजकुवर कचरे यांनी साकारली.
यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ.धनश्री पाटील शाहुवाडी तालुका सांस्कृतिक कला मंच अध्यक्ष शिवराज पाटील, उपाध्यक्ष संदीप पाटील, कोषाध्यक्ष शिवाजी सिंघण, सचिव गोरक्ष पाटील, आनंदा डांगे, निलेश भस्मे, डॉ. प्रा. प्रकाश नाईक, कीर्तनकार विजयमाला सकटे, शिवाजी सुतार, रामभाऊ सातपुते, मोतीराम पाटील, तानाजी लाड,संजय पाटील, बाजीराव हिरवे, ढोलकी वादक आनंद फाळके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सूत्र संचालन रमेश डोंगरे यांनी केले.
