सामाजिक

गौतम कांबळे सरांचे तृतीय पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन

बांबवडे : ज्यांनी जात-पात सब बकवास है , या आपल्या ब्रीद वाक्यातून समाजाला समानतेचा संदेश दिला. सर्व सामन्यांसाठी ज्यांनी रस्त्यावरची लढाई आपल्या हयातभर लढली. अशा दिलदार व्यक्तिमत्वाचे आज तिसरे पुण्यस्मरण आहे. ते म्हणजे काल कथित प्रा. गौतम कांबळे सर आणि आमच्या जीवाभावाचे मित्र होय. त्यांच्या या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

गौतम सर म्हणजे सर्व सामन्यांच्या हृदयातील अनभिषिक्त सम्राट होय. त्यांच्या अकाली निधनाने सामान्य जनतेची कोंडी झाली. आणि आमच्यासारखी मंडळी एका दिलदार मित्राला हरवून बसलीत. त्यांनी संस्कृती, प्रकृती आणि विकृती ची व्याख्या समाजाला पटवून दिली. असा समाजासाठी रात्रीचा दिवस करणारे हे व्यक्तिमत्व आज हवे होते. त्यांच्या अकाली निधनाने समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या समाजकारणाची धुरा आज त्यांचे बंधू श्रीकांत कांबळे आप्पा, व चिरंजीव अनिरुद्ध कांबळे आपल्या खांद्यावर घेवून पुढे चालले आहेत. पुनश्च गौतम सरांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली, आणि अभिवादन.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!