गुन्हे विश्व

मतदानासाठी येताना पुणे – मुंबई महामार्गावर अपघातात चरण मधील ३ ठार

शिराळा प्रतिनिधी : मतदानासाठी मुंबईहून गावी चरण( ता.शिराळा ) येथे येणाऱ्या संदीप श्रीपती पवार (१५), उमेश आबा नायकवडी (२३), तानाजी पांडुरंग नायकवडी(३८) या तिघांचा  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅव्हल्स बंद पडल्याने तिच्या मागे उभे राहिले असताना  ट्रकने अचानक पाठीमागून उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला.तर अन्य सातजण जखमी झाले.यामुळे चरण गावावर आज शोककळा पसरली आहे.
ही घटना आज सकाळी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.या बाबत समजलेली माहिती अशी,  क्लच प्लेट खराब झाल्याने ‘एम एच ४३-एच ३५३६’ या क्रमांकाची ट्रॅव्हलबस सर्व्हिस रोडवर उभी होती. त्यातील काही प्रवासी बसच्या मागे थांबले होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या ‘टी.एन. ८८ ‘ क्रमांकाच्या ट्रकने या बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे मागे उभ्या असलेल्या संदीप पवार, उमेश नायकवडी, तानाजी नायकवडी या  तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.  बस चालकाच्या डोक्याला मार लागला आहे. ट्रक चालकाच्या पायाला दुखापत झाली. या सर्वाना निगडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींची नावे खालीप्रमाणे:
श्रीपती गणपती पवार (६०),प्रवीण काशिनाथ नायकवडी (२४),हिंदुराव दगडू नायकवडी ( ४८), प्रथमेश सुभाष शिंदे (१४),बाबाजी पांडुरंग नायकवडी ( ४२), अहुब बाबू (ट्रक चालक) (३८) चेन्नई, दिनेश किसन कोळसे (२३)

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!