कुर इथं गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात : १ ठार तर १४ जखमी
कोल्हापूर : कोल्हापूर हून गारगोटी दिशेकडे निघालेली स्कार्पिओ गाडी कुर तालुका भुदरगड इथं वेदगंगा नदीच्या पुलावर संरक्षक कठड्याला धडकून नदीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. सदर घटनेची नोंद गारगोटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गारगोटी तालुका भुदरगड येथील आक्काताई कोळी यांच्या मुलाचा नुकताच विवाह समारंभ झाल्याने, कोळी कुटुंबातील मंडळी तुळजापूर इथं देवदर्शनाला स्कर्पिओ गाडी क्र.एम.एच.०९-बीआर-९२०७ घेवून गेले होते. मंगळवार दि.१३ जून रोजी परत येत असताना पहाटे साडेतीन च्या सुमारास कूर तालुका भुदरगड येथील वेदगंगा नदीच्या पुलावर येत असताना, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला,आणि गाडी पुलावरील संरक्षक कठड्याला धडकली. धडक जोरात असल्याने गाडीतील सौ.सविता प्रमोद कोळी ( वय ३२ वर्षे )रहाणार पुणे या गाडीतून बाहेर फेकल्या गेल्या. परंतु त्या गाडीखालीच आल्याने जागीच ठार झाल्या. तर गाडीतील १४ जण जखमी झालेत.जखमींना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नवे पुढीलप्रमाणे : संग्राम कोळी (वय २३ ), रोहन कोळी ( वय २६ ), प्रमोद कोळी (वय २५ ), अविनाश कोळी ( वय २५ ), अशोक कोळी (वय ५९ ), रजनीगंधा कोळी (वय २२ ),सुरेखा कोळी (वय ३० ),स्वीटी कोळी (वय १०), श्रुती कोळी (वय ०७ ),श्रेयस कोळी (वय ०९ ),शरयू कोळी (वय०७ ),वर्ष कोळी (वय २४ ), आक्काताई कोळी (वय ५७ ).