सामाजिक

ग्रामपंचायत बांबवडे मध्ये “आण्णाभाऊ साठे” यांची जयंती संपन्न

बांबवडे : ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय मध्ये १ ऑगस्ट २०२६ रोजी आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.

यावेळी प्रतिमा पूजन सरपंच भगतसिंग चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. पत्रकार मुकुंद पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य  सुरेश नारकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, शाहीर आण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या काळात समाजाला विशेष संदेश दिला. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावली. मुंबईत  राहताना मुंबईकरांनी  त्यांच्या आर्थिक आणि मानसिक व्यथेची कथा त्यांनी आपल्या गाण्यातून मांडली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली. अशा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी माजी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, दीपक निकम, शरद निकम, विजय कांबळे, अमर निकम, सर्जेराव निकम तात्या, दिलीप बंडगर, उपसरपंच सौ. मनीषा कांबळे, प्रदीप माने, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार विशाल साठे यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!