डम्पर चालकांच्या वेगाला पोलीस आवरणार का?
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यात नागपूर- रत्नागिरी हायवे चे काम सुरु आहे. या कामासाठी वापरले जाणारे डम्पर अतिशय वेगाने ये-जा करीत असल्यामुळे दुचाकी वाहनांना जागा मिळत नाही. यांच्या वेगामुळे अनेक अपघात होत असून, यावर परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. यावर पोलीस प्रशासन लक्ष घालणार आहे कि नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे.

दोन दिवसांपूर्वी वाघबीळ घाटाजवळ एका डम्पर ने एका दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकी स्वराची पत्नी जागीच ठार झाली. आणि दुचाकीस्वार जखमी झाला. यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. आईला, लेकाचे यश आईला पाहता आले नाही. आणि कुटुंब दु:खाच्या सागरात बुडाले. डोणोली तालुका शाहुवाडी येथील आनंदा पाटील यांची हि कहाणी आहे. एक सरळ साधा माणूस या अपघाताने बिथरला आहे. त्याचा संसार उध्वस्त झाला आहे. अशी अनेक कुटुंबे या डम्पर वाहनाच्या वेगाने उध्वस्त होत आहेत. एक तर यांच्या वेगावर पोलीस खात्याचे लक्ष नाही. तसेच या वाहनावरील चालक मद्यपान करून वाहन चालवीत असेल तरी देखील अपघात होवू शकतात.

यासाठी या हायवे च्या कामावरील डम्पर चालकांची मद्यपानाची टेस्ट सातत्याने होणे, काळाची गरज आहे. यासाठी पोलीस खाते तयार आहे का? कि, आणखी किती अपघात घडून संसार उध्वस्त होण्याची वाट पाहणार आहे.
