स्मार्ट मीटर ची सक्ती केल्यास आंदोलन : स्वाभिमानी पँथर्स
बांबवडे : महाराष्ट्र राज्यातील वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पँथर्स प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कांबळे करुंगळेकर यांनी दिला आहे.
वीज वितरण कंपनीने नागरिकांवर स्मार्ट मिटर बसवण्याची सक्ती सुरु केली आहे. त्या विरोधात सरूड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर स्वाभिमानी पँथर्स प्रतिष्ठान च्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी प्रकाश कांबळे पुढे म्हणाले कि, ग्राहकांना विश्वासात न घेता शासनाने हा मनमानी कारभार सुरु केला आहे. संपूर्ण राज्यात हा विषय संवेदनशील होत आहे. शासनाने याचा विचार करावा. याप्रकरणी ग्राहकांना वेठीस धरून स्मार्ट मीटर ची सक्ती करू नये. असेही प्रकाश कांबळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश माने, प्रदेश उपाध्यक्ष सचिन कांबळे, आर.एस.कांबळे, प्रदेश सरचिटणीस अनिल कांबळे, धनाजी गुरव, राजाराम मगदूम, प्रदीप माने, यशवंत गजापुरकर, यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन वीज वितरण चे तालुका अभियंता अनिल कुंभार यांना देण्यात आले.
