धोरणात्मक निर्णय बहुमताने घेता येतो- उपसभापती
बांबवडे : अनेक धोरणात्मक निर्णय हे बहुमताने घेण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार आहे. विरोधी गटाने आपल्याला आवश्यक असल्यास केवळ विरोध दर्शवू शकता. असे मत शाहुवाडी पंचायत समितीचे उपसभापती अमरसिंह खोत यांनी व्यक्त केले.
दि. ५ मे २०२६ रोजी शाहुवाडी पंचायत समितीची दुसरी मासिक सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी शाहुवाडी पंचायत समितीची मासिक सभा राष्ट्रगीताने सुरु झाली. इथून पुढे नेहमीच राष्ट्रगीताने मासिक सभा सुरु करण्यात येईल, असा धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आला. दरम्यान नसरापूर येथील घटनेचा निषेध व त्या पिडीत चिमुकलीला दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
मासिक सभेत सॅनीटरी नॅपकीन च्या वाटपावरून विरोधी गट नेते श्री अभयसिंह चौगुले यांनी वाटपाच्या बैठकीला विरोधी गटाला का बोलाविले नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून झालेल्या शाब्दिक वादातून धोरणात्मक निर्णय बहुमताने घेण्याचा सत्ताधाऱ्यांना आहे. असे सांगितले.
यावेळी कृषी खात्याच्या नीलम चाकनेकर यांनी सांगितले कि, शेतकऱ्याच्या बांधावर जावून, कृषी सहाय्यक माहिती देणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यालयात कर्मचारी नसतात, असे उपसभापती यांनी विचारल्यानंतर ते गाव भेटीला जातात,असे सांगितले. यावेळी गोपीनाथ मुंडे योजने अंतर्गत शेतकऱ्याला अपघाती विमा मिळत आहे. त्याची वर्गवारी दोन लाख, एक लाख अशी आहे. अपघातातील घटनेवरून हि विगतवारी ठरविली जाते.
आता शेतकऱ्याचा शेतीचा खरीप हंगाम सुरु होत असून शेतकऱ्यांना बी बियाणांची गरज भासत आहे. कृषी केंद्रावर उपलब्ध होणारे बियाणे योग्य आहे का? यासाठी कृषी केंद्रावर छापा टाकणे, सारखी कृती करावी, असे आवाहन देखील उपसभापती यांनी केले.
दरम्यान शाहुवाडी वनक्षेत्र अधिकारी शाहुवाडी पंचायत समिती च्या दुसऱ्या बैठकीला सुद्धा उपस्थित नव्हत्या. यावरून मासिक सभेत गदारोळ झाला. पंचायत समितीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्या घाबरत आहेत का? असा प्रश्न सुद्ध यावेळी विचारला गेला. यावेळी त्यांचे वरिष्ठ अधिकारी धैर्यशील पाटील यांच्याशी संपर्क साधला देखील त्यावेळी सुद्धा त्या उपस्थित नव्हत्या.
यावेळी सदस्या डॉ. धनश्री पाटील म्हणाल्या कि, आपल्याकडे जंगल समृद्धी आहे,त्यातून छोट्या प्रमाणातील अभयारण्य उभे करता येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वनक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी सांगितले कि, तसा प्रस्ताव पाठवायला पाहिजे. तसेच आंब्यातून जंगलात जाणारा रस्ता धरला असून,तो लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे श्री कोकितकर यांनी सांगितले.
यावेळी सदस्य श्री सुरेश पवार म्हणाले कि, कृषी खाते जे नाचण्याचे बियाणे देणार आहात ते ७ जून नंतर मिळाल्यावर त्याचा काही उपयोग नाही. यावेळी एसटी खात्याने मलकापूर विशाळगड एसटी सुरु व्हावी. मलकापूर बाजारभोगाव एसटी सुरु व्हावी अशी मागणी केली.
आरोग्य विभागाबाबत डॉ.धनश्री पाटील यांनी प्रसुतीच्या गणने बाबत प्रश्न विचारला असता, तो दर मासिक २० आहे. एवढा कमी दर का ? असा प्रश्न विचारला असता, बांबवडे येथील प्रतिभा मॅटर्नीटी च्या डॉ. बलसाणे या मलकापूर ग्रामीण रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ आहेत. त्यामुळे तिथे प्रसूतीसाठी येणाऱ्यांना खाजगी रुग्णालयात अप्रत्यक्षरीत्या पाठविले जातात. यामध्ये १०८ रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर यांचे एजंट आहेत, असा आरोप देखील सभागृहात करण्यात आला. दरम्यान मलकापूर ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस मशीन आले असून, महिन्या अखेर पर्यंत हि सेवा सुरु करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी वीज वितरण कंपनी चे श्री कुंभारे साहेब यांनी मान्सून पूर्व कामे सुरु असल्याचे सांगून ती लवकरच पूर्ण होतील. मांजरे इथं ट्रान्सफार्मर लवकरच बसवण्यात येईल. थावडे इथं सांगली विभागाकडून वीज पुरवठा होत होता, तो देखील लवकरच आपल्या विभागाकडून करण्यात येईल. त्यासाठी ५ ए. व्ही. ऐवजी १० ए.व्ही. चा ट्रान्सफार्मर बसवण्यात येणार आहे.
यावेळी धनश्री पाटील यांनी कडवी नदीवरील पुलाच्या स्लॅब च्या सळ्या बाहेर आल्या असून तो रस्ता लवकरच पूर्ण करून घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.
यावेळी पिशवी सदस्या लक्ष्मी पाटील यांनी एसटी च्या अधिकाऱ्यांना सांगितले कि, कोल्हापूर रत्नगिरी एसटी शाहुवाडी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी थांबत नाही, याचा अर्थ काय ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ती एसटी थांबणे गरजेचे आहे. अशा गाड्यांचे क्रमांक लिहून घेवून पाठवल्यास त्यांच्यावर कारवाई करता येईल.
यावेळी अभयसिंह चौगुले यांनी सुद्धा मलकापूर कोल्हापूर एसटी बसेस नेहमीच ब्रेक डाऊन होतात. याबाबत एसटी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
दरम्यान गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी साळशी येथील जीवन विद्यामंदिर शाळेच्या सुस्थापनेचे विवरण प्रोजेक्टर च्या माध्यमातून सभागृहाला दाखवले.
जल जीवन मिशन अंतर्गत चरण येथील पाणी पुरवठा योजना अद्याप हस्तांतरित का झाली नाही. पंपिंग स्टेशन ला ठेकेदाराने टाळा मारले असे का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला.
मासिक सभेचे आभार उपसभापती अमरसिंह खोत यांनी मानले.
