मागील गाळपाचा दुसरा हफ्ता मिळावा-स्वाभिमानी ची मागणी
बांबवडे : सन २०२५-२६ मध्ये तुटलेल्या ऊसाचा दुसरा हफ्ता ३००/-रुपये मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे अथणी शुगर्स ली. युनिट २ कडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यंदा ऊसाचा उपपदार्थांना चांगल भाव मिळत आहे. तसेच साखर सुद्धा यंदा तेजीच्या भावात दर मिळत आहे. परंतु शेतकरी मात्र ऊस तोडणी चा खर्च, खतांचा खर्च, वाहतूकदरांचा खर्च या सगळ्या खर्चांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा तुटलेल्या ऊसाचा दुसरा हफ्ता त्याला अद्याप मिळालेला नाही. तो त्यांना त्वरित मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करीत आहे.
सदर च्या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, संतोष पाटील, अमर पाटील, अनिल पाटील, शामराव पाटील, मनीष तडावळेकर, पांडुरंग लाड, मुकुंद पाटील, राजू वडाम, आनंद पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.
