प्रशासकीयराजकीयसामाजिक

मुंबईत १ मे ते १५ ऑगस्ट मराठी शिकवणार-श्री सरनाईक

 बांबवडे : मुंबई तील रिक्षा टॅकसी चालकांना परिवहन खात्यामार्फत मराठी शिकवले जाईल. महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला मराठी आलेच पाहिजे,अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

दरम्यान रिक्षा तथा टॅकसी चालकांनी याला विरोध केला होता. परंतु शासन मराठी शिकवणार आहे. त्यासाठी १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या काळात ज्यांना मराठी बोलायला येत नाही, त्यांना परिवहन अधिकारी मराठी शिकवतील.असेही मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

त्यानंतर ज्यांना मराठी येत नाही त्यांचे रिक्षा, टॅकसी परवाने रद्द करण्यात येतील. अशीही ठाम भूमिका श्री सरनाईक यांनी घेतली आहे. दरम्यान अमराठी रिक्षा टॅकसी  चालकांनी मराठी शिकण्याची भूमिका घेतली असल्याचे समजते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!