वॉटर मीटर च्या नावाखाली ६,३१,७७८/- रुपयांचा अपहार-श्री अभयसिंह चौगुले
बांबवडे : ग्रामपंचायत बांबवडे तालुका शाहुवाडी येथील कारभारात वॉटर मीटर च्या नावाखाली सुमारे ६,३१,७७८/- रुपयांचा अपहार करण्यात आला असून, सदर घटनेची शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी शाहुवाडी पंचायत समितीचे गट नेते श्री अभयसिंह चौगुले यांनी केली आहे. तशा आशयाची पत्रे त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी प्रशासनाला दिली आहेत.
सदर ची माहिती त्यांनी बांबवडे येथे पत्रकार परिषद घेवून दिली आहे.
याबाबत श्री अभयसिंह चौगुले सविस्तर माहिती देताना म्हणाले कि, सन २०२२ साली तत्कालीन ग्रामपंचायत चे कारभारी तसेच ग्रामसेवक यांनी गावात ग्रामपंचायत स्तर १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून वॉटर मीटर बसविणेसाठी सुमारे १०,६९,२३९/- रुपये किमती चे एस्टीमेट तयार करण्यात आले. यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली. परंतु सदर चे वॉटर मीटर मागविणेसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. तसेच वॉटर मीटर खरेदी चे बिल नाही, असे असताना गावात वॉटर मीटर बसविनेत आलेले नाही. तरीदेखील यासाठी सुमारे ६,३१,७७८/- रुपयांचा निधी खर्ची पडलेला दाखविण्यात आला आहे. सदर चे वॉटर मीटर चे बिल सोनवडे तालुका शाहुवाडी येथील आकाश ज्ञानदेव पाटील यांच्या नावे काढण्यात आले आहे. दरम्यान दलित वस्ती साठी २,०७,५७४/-रुपये, तर सर्व साधारण वर्ग साठी ४,२४,२०४/- रुपये अदा करणेत आले. असे असताना बिले अदा करण्या अगोदर सदर चा प्रस्ताव २७/६/२०२२ रोजी रद्द करणेत आला असल्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. प्रस्ताव रद्द झाल्यानंतर सदर च्या ठेकेदाराला २७/१०/२०२२,व २१/१०/२०२२ रोजी बिलांची रक्कम अदा करण्यात आली आहे. यामुळे नेमका कारभार काय सुरु आहे, हा प्रश्न आता उपस्थित झाला असून, या कारभाराचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न पडला आहे.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत आयत्या वेळ च्या विषय अंतर्गत वॉटर मीटर चा विषय निघाला असता, चौकशी करू या, असे सांगितल्यानंतर सदर बाबत चौकशी केली असता, हि माहिती उघड झाली, असे श्री अभयसिंह चौगुले यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच दीपक निकम, अमर निकम आदी मंडळी उपस्थित होती.
