सामाजिक

आत्ता ‘ सरपंच ‘ सुद्धा थेट जनतेतून निवडणार

मुंबई : सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. असा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. हा निर्णय ऐतिहासिक असून, यासाठी सरपंच पदाची शैक्षणिक अहर्ता सातवी अशी ठेवण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया सामान्य जनतेतून निर्माण होत आहे.
‘ नगराध्यक्ष ‘ पदाच्या निवडीनंतर आता ‘ सरपंच ‘ पदही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार यासंदर्भात वटहुकूम काढणार आहे. त्यानंतर कायदा मंजूर केला जाणार आहे.
येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये साधारणतः ८ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागणार आहेत. त्यांनाही हा निर्णय लागू होणार आहे.
सरपंचांच्या अधिकारांमध्येही वाढ केली गेली आहे. गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरपंचाकडे देण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अधिकारही वाढविण्यात आले आहेत.
१९९५ नंतर जन्म झालेल्या इच्छूकांना हि अट लागू असेल. १९९५ पूर्वी जन्म झालेल्यांना ७ वी उत्तीर्णची अट लागू असणार नाही.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!