शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार समिती -मुख्यमंत्री
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली असून, हि समिती शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करेल आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करेल, तेंव्हा शेतकरी आंदोलनाचा प्रश्न चर्चेतून सोडवावा ,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या या समितीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते,या सर्व मंत्र्यांचे नेतृत्व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. शेतकरी नेत्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.