संपादकीयसामाजिक

पत्रकार सुभाषराव बोरगे यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

 बांबवडे : शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक उपाध्यक्ष तसेच दैनिक पुण्यनगरी चे शाहुवाडी तालुका प्रतिनिधी व आमचे परम मित्र श्री सुभाषराव महिपती बोरगे राहणार साळशी यांना आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज व शाहुवाडी तालुका पत्रकार संघ व वयैक्तिक मुकुंद पवार आणि परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

श्री सुभाषराव बोरगे यांना पत्रकारिता क्षेत्रातील सुमारे ३० वर्षांचा गाढा अनुभव आहे. एकेकाळी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही एकत्रपणे बॉक्साईड च्या ट्रक मधून प्रवास करीत पत्रकारिता जापाळी आहे. त्याकाळात पत्रकारिता करणे म्हणजे वादळात दिवा लावण्याचा प्रकार होता. तुटपुंजे मानधन, त्यातून येण्या-जाण्याचा खर्च सुद्धा निघत नव्हता. अशा काळात कोणत्याही प्रकारचे छक्के-पंजे न करता, कोणालाही ब्लॅक्मेलिंग सारखे प्रकार न करता, व कोणालाही पत्रकारितेचा धाक दाखवून आपले इप्सित सध्य न करता, केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आजवर पत्रकारिता जपली आहे.

अशा निस्वार्थ व्यक्तिमत्वाला मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीची बीजे रुजविणारा ठरणार आहे.

आयुष्यात या बातमीतून आपल्याला काही मिळणार आहे का? याची तमा न बाळगता पत्रकारिता करणारे पत्रकार सध्याच्या काळात कमीच उरले आहेत. तरीदेखील निवड समिती ने  श्री सुभाषराव बोरगे यांची केलेली निवड खऱ्या अर्थाने निस्वार्थ निवड ठरत आहे. यासाठी निवड समिती मधील  सभापती सौ प्रियांका भोसले, उपसभापती अमरसिंह खोत, गटविकास अधिकारी मंगेश कुन्चेवार, सहा. गटविकास अधिकारी सुनील पाटील या मान्यवरांचे शाहुवाडी तालुका पत्रकार संघ मनापासून आभार मानीत आहे. तसेच या पत्रकारितेच्या कालावधीत ज्यांनी सहकार्य केले, असे ज्ञात,अज्ञात सर्वच हितचिंतकांचे तसेच श्री विठ्ठल पाटील ज्येष्ठ पत्रकार यांच्यासह शाहुवाडी तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे मनस्वी आभार.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!