सामाजिक

महामानवांच्या विचारधारेमुळेच समाज परिवर्तन – भिकाजी कांबळे

शाहुवाडी :महामानव क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण सर्व समाज, समाजाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट झालो. त्यांच्या विचारधारेमुळेच संपूर्ण मानव जातीमध्येच परिवर्तन झाले आहे. असे मत प्रतिपादन भारतीय महासभेचे केंद्रीय सचिव भिकाजी कांबळे यांनी केले.

करुंगळे तालुका शाहुवाडी इथं पंचशील तरुण मंडळाच्या वतीने  संयुक्त जयंती संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे मुंबई अध्यक्ष भगवान कांबळे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिकाजी कांबळे बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले कि, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, या महापुरुषांची विचारधारा तरुणांनी आत्मसात करावी. आज खऱ्या अर्थाने या देशाला महापुरुषांच्या विचारधारेची गरज आहे. समाज परिवर्तनासाठी संघटन, संघर्ष आणि शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. महामानवांची विचारधारा प्रत्येक भारतीयांसाठी कल्याणकारी आहे, आणि तो समतेचा मार्ग आहे.

यावेळी रमेश डोंगरे, अनिरुद्ध कांबळे, सरपंच माधव कळंत्रे , जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांजरेकर या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी मलकापूर चे नगरसेवक रविराज कोकरे-देसाई, आनंद वारंग, विष्णू गुरव, आनंद कांबळे, सचिन कांबळे, अनिल कांबळे, आकाश कांबळे, अरुण कांबळे, सर्जेराव कांबळे, विकास कांबळे, तेजस कोल्हापूरकर, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुणीजनांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा  मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदीप कांबळे यांनी मानले.  

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!