राजकीय

अपयश यशाची पहिली पायरी : रणवीरसिंग गायकवाड

मलकापूर (प्रतिनिधी ) : अपयश हि यशाची पहिली पायरी समजून जनतेच्या विकासासाठी मि सदैव तयार असेन.आणि सत्यजित आबा व आमच्या गटाची युती हि पुढेही अशीच राहील. असे मत युवक नेते रणवीरसिंग  गायकवाड यांनी या निवडीच्या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न शील राहण गरजेच आहे.

या वेळी बोलताना माजीआमदार बाबासाहेब पाटील म्हणाले,गटतट न मानता नुतनपदाधिकारी यांनी सदैव  जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहुन आपल्यावर असलेली जबाबदारी यशस्वी पार पाडणे गरजेचे आहे.

दरम्यान नुतन सभापती सौ डॉ स्नेहा जाधव आणि उपसभापती श्री दिलीप पाटील यांचा सत्कार माजी आमदार बाबासाहेब पाटील ,शिवसेना जिल्हा प्रमुख मुरली धर जाधव, उदय साखर चे संचालक रणविरसिंग गायकवाड ,गोकुळच्या संचालिका अनुराधा पाटील ,आदिच्या प्रमूख उपस्थिती त करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना नुतन सभापती डॉ. सौ .स्नेहा जाधव म्हणाल्या कि, आज माझ्यावर सर्व सामान्य जनतेन टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून विकासाल गती देण्यासाठी सदैव  प्रयत्नशील राहण्याची ग्वाही सभापती यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

सभापती व उपसभापती निवडीनंतर सर्मथकानी फटाक्यांची आताश बाजी आणि गुलालाची उधळन केली. यावेळी जि प सदस्य हंबीरराव पाटील, माजी उपसभापती नामदेव पाटील ,पंडीत शेळके ,उपसभापती दिलीप पाटील , सभापती सौ स्नेहा जाधव यानी मनोगत व्यक्त केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!