वृक्षारोपणासाहित संवर्धन गरजेचे – सौ.शैलजादेवी गायकवाड
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. शैलजादेवी गायकवाड ( वहिनीसाहेब )यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक पर्यावरण दिन निमित्त आंबा तालुका शाहुवाडी इथं रोपांचे वाटप करण्यात आले.
आंबा तालुका शाहुवाडी इथं हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सौ. शैलजादेवी गायकवाड वहिनीसाहेब यावेळी म्हणाल्या कि, केवळ झाडे लावून चालणार नाही,तर त्याचे संवर्धन सुद्धा झाले पाहिजे,यासाठी प्रत्येक नागरिकाने केवळ एक तरी झाड या पावसाळ्यात लावावे, असा संदेश त्यांनी उपस्थिताना दिला.यावेळी रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती चे अध्यक्ष संग्राम खराडे कुलदीप दवंग,प्रशांत जंगम व कार्यकर्ते उपस्थित होते.